Posts

Showing posts from February, 2024

कसोटी क्रिकेटच्या भल्यासाठी ...

Image
भा रताने इंग्लंडविरुद्धची चौथी कसोटी जिंकून मालिका खिशात टाकली. आता पाचवी आणि शेवटची कसोटी सात मार्च रोजी सुरु होईल. चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराह या आपल्या सर्वात उत्तम वेगवान खेळाडूला विश्रांती देण्यात आली होती. तरी रविचंद्रन आश्विन ,  रवींद्र जडेजा आणि नवोदित आकाश दीप यांनी बुमराहची उणीव भासू दिली नाही. रांचीमध्ये नवा समर्थ यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलच्या रूपाने आपल्याला मिळाला. जुरेलने यष्टिरक्षण आणि फलंदाजी या दोन्ही बाबींमध्ये जी चमक दाखवली ती निश्चितच सुखावह होती.   गेल्या काही कसोटी सामन्यांचा इतिहास पाहिला तर कसोटी पाचव्या दिवसापर्यंत जातेच असे नाही. याचा दोष सर्वस्वी खेळपट्टीला देऊन चालणार नाही. काही अंशी खेळपट्टी, काही अंशी उत्तम गोलंदाजी आणि काही अंशी ढेपाळलेली फलंदाजी यास जबाबदार आहे असे दिसते. पाच दिवसांची कसोटी हेच खरे क्रिकेट असे नेहमी म्हटले जाते. ते खरेच आहे. परंतु अलीकडची परिस्थिती पाहिली तर झटपट क्रिकेट व त्यात मिळणाऱ्या पैशांवर डोळा ठेवून कसोटी क्रिकेट न खेळात टी 20 च्या आयपीएल मध्ये खेळण्याकडे जास्त लक्ष दिले जाते. हे दिसून आले आहे. कसोटी क्रिकेट खेळणारे...