शालेय गणवेश महत्वाचा की शैक्षणिक गुणवत्ता ?
स रकारी आणि अनुदानप्राप्त शाळांमध्ये एकच गणवेश असेल असे धोरण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यानी जाहीर केले आहे. विदर्भ वगळता राज्यातील अन्य सर्व ठिकाणच्या शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. म्हणजे जेमतेम तीन आठवड्यांनी. अशा वेळेस सरकारला जाग आली आहे. बऱ्याच शाळांनी गणवेशाची आधीच ऑर्डर दिली असल्याने त्यांची पंचाईत होऊ नये म्हणून सोमवार, मंगळवार, बुधवार शाळेने निश्चित केलेला गणवेश आणि गुरुवार, शुक्रवार, शनिवार सरकारने ठरवलेला गणवेश असा विचित्र प्रकार राहणार आहे. गणवेश हे प्रत्येक शाळेचे वैशिष्ट्य असते आणि शैक्षणिक गुणवत्तेप्रमाणेच त्या गणवेशानुसारही ती शाळा ओळखली जाते. गणवेशाचा नवा निर्णय खासगी शाळांना लागू नाही. या अर्थाने मुलांचे गणवेश वेगवेगळे असणारच आहेत. सरकारी / अनुदानप्राप्त शाळांचे विद्यार्थी आन खासगी शाळांमधील विद्यार्थी यांच्यातला ‘भेद’ आणखी वाढत जाणार आहे. दोन दशकांपूर्वीपर्यंत सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचा गणवेश एकच होता. नंतरच्या काळात शाळांना सरकारने पैसे दिले आणि गणवेश निवडायची मुभा दिली. मग हे गणवेश वेगवेगळे झाले. अजूनही ग्रामीण भागात एकच संस्थेच्या वेगवेगळ्या शाळा...