कर्करोगावर मात करताना…
क र्करोग अथवा अन्य कोणताही गंभीर आजार झाला तर आधीच शारीरिक व्याधीने त्रस्त झालेला रुग्ण मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्यता असते. अशा वेळेस डॉक्टर, कुटुंब, मित्रमंडळी यांचा पाठिंबा फार आवश्यक असतो. तो मिळाला तर रुग्ण अर्धा बरा होतो. अशा आजारात होणारा खर्च हा अवाढव्य असतो आणि जीवाची शाश्वती नसतानाही बँक खाते रिकामे करणारा असतो. त्यामुळे येणारे ताणतणाव आजारात भरच घालत असतात. वैद्यकीय विमा घेतला असला तरी तो पुरतो असे नाही. त्यामुळे आज समाजात बहुतांश लोकांना आजार झाल्यावर आर्थिक समस्या भेडसावत असल्याने पुरेसे व आवश्यक उपचार घेता येत नाहीत. परिणामी आजार कायम राहतो किंवा कदाचित त्यांना जीवही गमवावा लागतो. ती व्यक्ती घरातील कमावणारी एकमेव व्यक्ती असली तर कुटुंबाचे हाल होतात ते वेगळेच. मध्यंतरी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये डॉ. सुलोचना गवांदे यांनी कर्करोग, त्याबाबतचे समज -गैरसमज, उपचार, कर्करोगातून बाहेर आलेल्या रुग्णांचे अनुभव सांगणारी लेखमालिका लिहिली होती. ती बऱ्याच वाचकांनी वाचल्याने समाजात जागृतीचे चांगले काम झाले. त्या लेखांचे नंतर ‘पॉप्युलर प्रकाशन’ने पुस्तक काढले. आता त्याचे इंग्रजी...