डोळस प्रवासवर्णन आणि इतरही …
प्र वासवर्णन हा काही नवीन लेखनप्रकार नाही. अनेकांनी तो हाताळला आहे, त्यांना ‘जसे दिसले, जसे अनुभवले’ तसे एखादे पर्यटनस्थळ शब्दबद्ध केले आहे. अनेकदा पर्यटनाची ठिकाणे ‘नेहमीची’ म्हणजे काश्मीर, कुलू-मनाली, केरळ वगैरे असली तर नवीन काय पाहणार अथवा नवीन काय लिहिणार असा प्रश्न असतोच. परंतु प्रत्येक पर्यटकाला असे ‘नेहमीचे’ ठिकाण वेगळे दिसू शकते. सर्वसाधारणपणे ज्या भागाला सर्वच भेटी देतात तो भाग टाळून नवीन काही भाग धुंडाळणारे लोकही असतात. ते ‘यशस्वी’ पर्यटन कंपन्यांच्या मागे न लागत, स्वतः जोडीदारासमवेत अथवा कुटुंबियांसमवेत जमेल तसा प्रवास करतात. मोजकीच ठिकाणे पण तपशीलाने बघतात, अनुभवतात आणि आयुष्यात ते क्षण जपून ठेवतात. कधी लिहूनही ठेवतात. प्रत्येकाचेच प्रसिद्ध होते असे नाही. याचा अर्थ त्यांना काही वेगळे सांगण्यासारखे नाही असे अजिबात नाही. नाशिक आणि ठाणे अशी वास्तव्याची ठिकाणे असणाऱ्या सौ. आशा अरुण जोशी या खऱ्या (इतर विषयांबरोबरच) मराठी विषयाच्या शिक्षिका. परंतु मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्यावर आधी विविध कारणांमुळे न झालेली भटकंती लेखणीतून कागदावर उतरली. त्या लेखांच्या पुस्तकाचे प्र...