Posts

Showing posts from July, 2023

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्व अधोरेखित

  मुं बईतल्या ताज्या पावसाने दाणादाण उडविल्यावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्व अधिक अधोरेखित झाले आहे. रेल्वे, मेट्रो, ‘बेस्ट’ बस ही सार्वजनिक वाहतुकीची साधने आणि त्याबरोबर टॅक्सी, रिक्षा ही त्यांना अत्यंत पूरक पण खासगी मालकीची साधने यावर मुंबई ‘धावते’. मुंबईत जरा जास्त पाऊस पडला के त्या पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी पूरसदृश परिस्थिती निर्माण होते हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. नाल्यांची सफाई नीट होत नाही, शहरातला कचरा कमी होत नाही, ड्रेनेज यंत्रणा जुनी झाल्याने प्रश्न निर्माण होतात. यावर नुसती चर्चा होते. पुढच्या वर्षी परत तेच रडगाणे गायले जाते. त्यातच मुंबईला आडवी पसरायला जागा नसल्याने ती ‘उभी’ वाढत आहे. नवनवे तोवर उभे राहात आहेत. मुंबईत पाणी, वीज व इतर मूलभूत सुविधांवरचा ताण कमालीचा वाढत आहे, आणखी वाढणार आहे. अशा स्थितीत मुंबईकरांचे जीवन अधिक त्रासाचे होणार आहे यात शंका नाही. मुंबईत मेट्रो अलीकडच्या काळात आली, तोपर्यंत रेल्वे आणि रिक्षा, टॅक्सी यावरच सर्वसामान्य माणूस विसंबून होता. ज्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या आहेत त्यांची गर्दी मुंबईला अधिकाधिक घुसमटवून टाकत आह...

आवश्यक असे ‘संगीत पुनर्विकास’

Image
काही वर्षांपासून ‘पुनर्विकास’ हा शब्द मुंबईतच नव्हे तर देशभरातील महानगरांमध्ये खूप महत्वाचा ठरला आहे. मोडकळीस आलेल्या अथवा जुन्या झालेल्या इमारतींचा पुनर्विकास मुंबईत ज्या वेगाने होत आहे ते पाहता जागांचे / घरांचे संपूर्ण चित्र बदलून जाणार आहे. आधीची छोटी घरे आकाराने मोठी होत आहेत. कुटुंबांची सोय होत आहे, पण ज्यांच्याकडे महानगरात घर नाही, त्यांना ते घेणे अधिकाधिक कठीण होणार आहे. कारण नवीन जागांच्या किमती त्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. बहुतांश नवीन घरांमध्ये कुटुंबे एकत्र आली आणि त्याच वेळी बऱ्याच घरांमध्ये विभागलीही. जागांच्या किमतीमुळे कुटुंबात वाद झाले, भाऊ भाऊ एकमेकांविरुद्ध उभे राहिले. अनेक कुटुंबांची वाताहत झाली. गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची विश्वसार्हता धोक्यात येण्याचे प्रकार घडले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांनी पुनर्विकासात काही विशिष्ट लोकांना झुकते माप दिले आणि इतर लोकांना ते बघत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी आपण बरे की आपले घर बरे असे ठरवून गप्प बसावे लागले, असेही प्रकार घडले. विकासक नावाच्या व्यक्तीचा आणि त्याच्या पाठीशी असणाऱ्या प्रचंड मोठ्याआर...

अमेरिकेच्या बे एरियात निघाली वारी

Image
  आपण केवळ पायाने चालतो तो प्रवास होतो हृदयाने चालतो ती यात्रा होते पण देहभान हरपून जेव्हा चालतो तेव्हा ती होते वारी। दरवर्षी वारकऱ्यांनी सामुदायिकरित्या आषाढी एकादशीच्या आधी आळंदी ते पंढरपूर अशी केलेली पदयात्रा म्हणजे वारी. वारी महाराष्ट्राचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव आहे. वारकर्‍यांची माऊलीवर असलेली अतूट भक्ती, अमाप श्रद्धा आणि त्याच्या दर्शनासी केलेला दृढ निर्धार, चिकाटी, अथक परिश्रम, ऊन – पाऊस – वारा यांची तमा न बाळगता अविरत पायी वाटचाल करण्याची सिद्धता. आषाढी वारीचे आपणा सर्वांनाच नेहमी कुतुहल असते. कसे हे वारकरी उन्हातान्हात एवढे मैलोनमैल चालत असतील? कुठे राहात असतील? काय खात असतील? आणि मग जशा वारीच्या बातम्या यायला लागतात तसे आपणही एकदातरी हा अनुभव नक्की घ्यावा ही सुप्त इच्छाही मनात जागी होते. अमेरिकेतील बे एरियातील काही  मंडळी ह्या वर्षी पंढरपूरच्या वारीला निघणार होती. त्यानिमित्त झालेल्या एका कार्यक्रमातच प्रथमच बे एरिया मधे होणाऱ्या वारीची बीजं रुजली.  MMBA   चे अध्यक्ष  भास्कर रानडे  आणि  वीणाताई उत्तरवार  ह्यांना ही कल्पन...

राजकीय नाती दुरावत चालली …

  अजितदादा पवार आज ना उद्या धाडसी पाऊल उचलणार हे गेल्या काही महिन्यांच्या त्यांच्या हालचालींवरून दिसत होते. ते त्यांनी दोन जुलै २०२३ रोजी उचलले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठ आमदारांसह त्यांचा शपथविधी झाला तेव्हा डबल इंजिन सरकारला आणखी एक इंजिन मिळाले. आता यात कोणत्या इंजिनची ‘पॉवर’ जास्त, कोणाची कमी हा प्रश्न या घडीला बिनबुडाचा आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, देवेंद्र फडणवीस यांचा भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हे तिघे एकत्रितपणे महाराष्ट्राचा विकास खूपच वेगाने करणार आहेत, हे बघून राज्यातील मतदार पावसाने सुखावतो तसा सुखावला आहे असे काही जणांना वाटायला लागले आहे, असे दिसते. शरद पवार यांनी आता वयाच्या ८३ व्या वर्षी पुन्हा मैदानात उतरून नव्याने पक्षबांधणी करण्याचा निर्धार केला आहे. त्याचवेळी अजितदादांच्या ‘मी राष्ट्रवादी पक्षातच आहे’, या दाव्यावर कोणताही न्यायालयीन लढा न देण्याचा निर्णयही घेतला आहे. या सगळ्यात खरी अडचण आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि त्यांच्यावर विसंबून मूळ शिवसेना सोडून नव्या राजकीय समझोत्यात सामील झालेल्या आमदारांची. उद्या त्यांन...