Posts

Showing posts from October, 2023

कौतुकास्पद यश

भा रतीय खेळाडूंच्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होते आणि हे यश क्रिकेटशिवाय इतर खेळांमधील आहे ही बाब खूप सुखावून जाणारी आहे. नुकत्याच संपलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ ब्राँझ पदकांसह विक्रमी १०७ पदकांची कमाई केली. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या यशात क्रिकेट संघाचाही वाटा असला तरी तो एकूण स्पर्धेच्या तुलनेत इवलासा होता हे महत्वाचे आहे. नेमबाजी, घोडेस्वारी, टेनिस, स्क्वाश, अॅथलेटिक्स, तिरंदाजी, हॉकी, कबड्डी, बॅडमिंटन, रोविंग, सेलिंग , वुशू, गोल्फ, बॉक्सिंग, ब्रीज, टेबल टेनिस, कुस्ती, रोलर स्केटिंग, सपक टेकरा … यापैकी प्रत्येक खेळात भारताने पदक मिळवले. २००२ नंतर भारताची कामगिरी चढत्या क्रमाने होत आहे. अपवाद २०१४चा. २००२मध्ये ३६ पदके होती, २००६ मध्ये ५३, २०१० मध्ये ६५, २०१४ मध्ये ५७, २०१८मध्ये ७० आणि आता शंभरीपार १०७ ! फक्त क्रिकेटपटूंचे कौतुक करण्याची सवय असणाऱ्या भारताला हा अलीकडच्या काळातला सर्वात मोठा सुखद धक्का म्हणायला हवा. प्रत्येक खेळाडूचे अभिनंदन. ! भारताने अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केली. सुवर्णपदकांच...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी कायमस्वरूपी काम

काल एक ऑक्टोबर रोजी अनेक राजकीय नेते हातात लहान मोठा झाडू घेऊन रस्ता अथवा त्या लगतचा भाग साफ करताना आपण पाहिले. हे कृत्य स्वच्छतेचा संदेश देणारी प्रतीकात्मक कृती होती हे मान्य करायला हवे. त्यांनी रोज हे काम करणे अपेक्षितही नाही. परंतु, स्वच्छता ही एका दिवसाची गोष्ट नाही. एक दिवस साजरा झाला की दुसऱ्या दिवसापासून परत सगळे सुरळीत होते हे आपण अनेकदा पाहिले. राजकीय / सामाजिक क्षेत्रातील मोठ्या लोकांच्या जयंती / पुण्यतिथी या दिवशी  त्यांची आठवण जागवली जाते, पण त्यांची शिकवण बाकीचे ३६४ दिवस किती लोक लक्षात ठेवतात हा प्रश्नच आहे. स्वच्छता असो, जयंती / पुण्यतिथी असो वा अन्य सामाजिक उपक्रम असोत, त्यात सातत्य नसले की मूळ अपेक्षित काम होऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर एक ऑक्टोबरलाच हिंदुस्थान टाइम्स या इंग्रजी दैनिकात नीरज पंडित यांनी दिलेली बातमी लक्षवेधी वाटली. ती होती वृक्ष लागवडीची. वृक्षारोपणाचेही ‘इव्हेंट’ आपल्याकडे होतात. रोप लावतानाचे फोटो छापून येतात. नंतर त्या रोपांचे काय होते, किती जागवली जातात आणि किती अदृश्य होतात ते कळतही नाही. परंतु मी ज्या बातमीबद्दल बोलतो ती बातमी वेगळी आहे. ...

ग्रंथ संयुक्त अरब अमिरातीच्या दारी....

Image
सा धारण पंधरा वर्षांपूर्वी आजच्याइतका समाजमाध्यमांचा प्रभाव नव्हता. वाचनसंस्कृती चांगल्यापैकी अस्तित्वात होती. आज अस्तंगत झाली असे मला सुचवायचे नाही, पण विविध वाचनालयांमधली वाचकांची घटती संख्या आणि घटलेली पुस्तकविक्री पाहता असे अनुमान काढता येते. समाजमाध्यमे, कोविड, ऑनलाईन वाचन यामुळे पुस्तक हातात धरून वाचणारे वाचक कमी झाले. हे वाचन वाढावे म्हणून पुस्तके वाचकांना घरी देण्याचेही उपक्रम सुरु झाले. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे विश्वस्त श्री. विनायक रानडे यांनी एकच ध्यास घेतला आणि तो म्हणजे वाचकांना त्यांच्या घराजवळ उत्तम वाचनीय पुस्तके उपलब्ध करून देण्याचा! त्यातूनच २००९ ला अशा वाचन प्रेमींसाठी ‘ग्रंथ तुमच्या दारी ‘ या योजनेचा उगम झाला. भारतात ह्या योजनेत १०० पुस्तकांची एक पेटी असते, जी साधारण ३५ वाचकांच्या समूहासाठी असते. भारताबाहेर या योजनेत सोयीनुसार बदल झाले. मूळ ध्येय पुस्तकवाचन अधिकाधिक व्हावे, अधिकाधिक वाचक या योजनेशी जोडले जावेत हे असल्याने ‘ग्रंथ तुमच्या दारी ‘ योजना अनेक घरांपर्यंत पोचली. मराठी भाषक जगभरात जवळपास प्रत्येक देशात आहेत...