Posts

Showing posts from March, 2024

घटत्या जन्मसंख्येचा असाही फटका !

  को णताही लहानमोठा उद्योगधंदा असो, ग्राहकांना नेमके काय हवे आहे, ग्राहकांची गरज काय आहे, हे पाहणे नेहमीच गरजेचे असते. न खपणारी उत्पादने कोणीच काढत नाही. उलट उत्पादनांमध्ये सतत सुधारणा करून ग्राहकाला ती अधिकाधिक उपयोगी कशी होतील आणि पर्यायाने उत्पादनांचा खप कसा वाढेल, पर्यायाने आपला नफा कसा वाढेल  हेच पाहिले जाते. त्यात काहीच चूक नाही. (अलीकडे जाहिरात तंत्राचा वापर करून ग्राहकांना गरज नसलेली उत्पादनेही माथी मारली जातात हा भाग वेगळा). प्रत्येक कंपनी ठराविक अंतराने हे करत असते. अगदीच काही नाही, तरी काही वेळा उत्पादनाचे वेष्टन बदलून, उत्पादनांच्या नावापुढे प्लस किंवा सुपर वगैरे शब्द वापरून उत्पादन अधिक ‘सशक्त’ झालेले भासवले जाते. हे सशक्ततेचे प्रमाण कमीजास्त असते. परंतु, एखादी कंपनी जेव्हा आपले लोकप्रिय उत्पादन कमी करून वेगळ्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करते तेव्हा त्याची दखल वेगळ्या अर्थाने घ्यावी लागते. समाजात घडत असलेल्या बदलाची दखल कंपन्यांही घ्यावी लागते ती अशी ! काल या संदर्भातील एक बातमी वाचली. ती होती जपानमधून. लहान मुलांसाठी नॅपी (लंगोट) बनवणाऱ्या जपानी कंपनीने या उत्पादन...

दिव्यांगांची राजकीय दखल कधी?

Image
अनेक भाषिक / इंग्रजी वर्तमानपत्राच्या शनिवार / रविवारच्या पुरवण्या वाचनीय असतात. भरमसाठ संख्येने वाढलेली टीव्ही चॅनेल्स आणि त्यांच्या जोडीला आलेली OTT यामुळे कन्टेन्टमध्ये वैविध्य आले असले आणि त्यांना लाखो प्रेक्षक लाभत असले तरी वर्तमानपत्रांच्या पुरवण्या स्वतःचे अस्तित्व केवळ टिकवून आहेत असे नव्हे तर आपला चांगला दर्जा राखून आहेत. या दोन दिवसांत अनेक विषय तपशीलाने वाचायला मिळतात आणि वेगवेगळी मतमतांतरेही कळतात. रविवारी २४ मार्चच्या अंकात नीरजा देवधर यांनी ‘मिड डे’ या दैनिकात लिहिलेला लेख एका वेगळ्या आणि दुर्लक्षित विषयावर आहे. दिव्यांग व्यक्तींना एरवीही जगण्यासाठी अनेक संघर्ष करावे लागतात. मूलभूत सोयी मिळण्यासाठी राजकीय / सामाजिक यंत्रणेला साकडे घालावे लागते. त्यातून वाट काढत अनेक दिव्यांग अनेक क्षेत्रात चमकत असतात, परंतु,  राजकीय आणि वैधानिक यंत्रणेने त्यांना जवळ केले आहे का? यावर पत्रकार नीरजा देवधर यांनी अनेक उदाहरणे देऊन ‘नाही’ असे उत्तर दिले आहे. हा लेख कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला अस्वस्थ करून जाईल यात शंका नाही.   लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विविध राजकीय पक्ष उमे...

जाहल्या काही चुका अन् ...

Image
  महाराष्ट्रात सध्या निवडणुकीच्या बातम्या आणि अनेक नेत्यांच्या तोंडातून निघणारे 'सुविचार' ऐकणे / पाहणे टाळायचे असेल तर 'यू ट्यूब' हा एक उत्तम पर्याय आहे. असंख्य उत्तम चॅनल्स / पॉडकास्ट इथे पाहायला / ऐकायला मिळतात. त्यातलेच एक म्हणजे 'स्मृतिगंध'. याचा गंध सर्वदूर पसरला आहेच. त्यांनी  'काचे पलिकडचे किस्से' या नावाने  नवीन कार्यक्रम सुरू केला आहे. राजेंद्र पाटणकर आणि किशोर सोमण ही दोन नावे घेतली की रेडिओ आठवतो आणि त्या माध्यमाशी निगडित असणाऱ्या असंख्य आठवणीही जाग्या होतात. रेडिओवर कार्यक्रम करताना काहीवेळा काय गमतीजमती होतात या विषयावर हे दोघे बोलले. जेव्हा लाईव्ह कार्यक्रम असतो तेव्हा निवेदकाच्या हातून चुका होण्याची शक्यता असते आणि त्यातून अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. या संदर्भातल्या काही आठवणी, आकाशवाणीतले वातावरण, दिग्गज कलाकार स्टुडिओमध्ये आल्यावर त्यांचे आलेले अनुभव अशा गप्पा पहिल्या भागात ऐकायला मिळाल्या. अर्थात फक्त या चुका म्हणजे रेडियो नव्हे, त्यामुळे पुढील काही भागांत विविध कार्यक्रम / कलाकार यांच्या हृद्य आठवणी ऐकायला अधिक आवडेल.    मर...

बुरा ना मानो, होली है …

  लो कसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर आता देशातील राजकारणाला खरा वेग आला आहे. राजकीय विचारधारा, निष्ठा वगैरे बाबी भूतकाळात जमा झाल्याने तिकीटवाटप होईपर्यंत कोणते नेते कुठे पळ काढतील हे सांगता येणे कठीण झाले आहे. एक पक्ष सोडला की दुसऱ्या पक्षात कोणतेही तिकीट वा पद किमान एक वर्षभर मिळणार नाही अशी अट घातली तर बहुदा एकही पक्षांतर होणार नाही. परंतु कोणताही पक्ष हे पाळणार नाही. कारण ते कोणत्याही पक्षाला सोयीचे नाही हे उघड आहे. ‘मी अमुक एका पक्षाच्या विचारधारेने प्रभावित होऊन त्या पक्षात जात आहे, कोणत्याही पदाच्या आमिषाने नाही,” असे सांगणारे नेते पक्षांतरानंतर काही तासांतच लोकसभेचे तिकीट अथवा राज्यसभा पदरात पाडून घेतात हेही आता नवीन राहिलेले नाही. याला महाराष्ट्रही अपवाद राहिलेला नाही. हे गेल्या साधारण दोन दशकांच्या राजकारणातून आपल्याला दिसले आहेच. गेल्या चार वर्षांत तर ही प्रक्रिया फारच वेगाने झाली आहे. आणि लोकसभा निवडणूक पार पाडल्यावर आणि विधानसभा निवडणुकीआधी आणखी किती वेगाने होईल याची फक्त कल्पनाच केलेली बरी ! भारतीय जनता पक्ष नेतृत्व करत असलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस नेत...