Posts

बातमी, विश्लेषण आणि अर्थ सांगणारे पुस्तक

Image
विख्यात पत्रकार राजीव साबडे यांनी लिहिलेले आणि ‘रोहन प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेले ‘वार्तांच्या झाल्या कथा’ हे पुस्तक पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या आणि काही वर्षे पत्रकारिता करणाऱ्या प्रत्येकाने वाचण्यासारखे आहे. ‘एका ज्येष्ठ पत्रकाराने अनुभवलेल्या विविध घटनांचे गोष्टीरूप चित्रण’ असे पुस्तकाच्या सुरुवातीला म्हटले असले तरीही वेगवेगळ्या घटनांचे रिपोर्ताज स्वरूपातले लेखन आणि ती घटना आज अनेक वर्षे होऊन गेली तरी डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी करण्याचे कसब हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. हे संपूर्ण लेखन कधीही कोणताही सवंगपणा आणि भडकपणा येऊ न देता केले असल्यामुळे ते अधिक विश्वासार्ह वाटते. श्री साबडे यांची संपूर्ण कारकीर्द पुण्याच्या 'सकाळ' या वृत्तपत्रात गेली. तब्बल ३४ वर्षे विविध संपादकीय पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांना देश-विदेशात वार्तांकन करण्याची संधी मिळाली आणि त्यातल्या काही घटनांवर त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकांमध्ये तेरा प्रकरणे आहेत आणि प्रत्येक प्रकरणातला तपशील हा स्वतंत्रपणे पुस्तक होऊ शकतो इतका भरगच्च आहे. या तेराही विषयांवर यापूर्वी कोणी लेखन केले नाही असे नाही,...

कशासाठी ...रेडिओसाठी !

सध्या तरुण पिढी मोबाईल आणि स्क्रीनच्या मागे लागली आहे, ते त्यात खूप वेळ घालवतात असे आरोप नेहमी होतात. त्यात बऱ्याच प्रमाणात तथ्यही आहे. त्याचे विपरीत परिणाम मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही होतात. कोरोंनाने सर्व वयोगटातील शाळकरी मुलामुलीना  हातात लवकर मोबाईल दिला असला तरी कोरोना संपल्यावर तो दूर झाला नाही. मुलांना कोणत्याही ताज्या घडामोडींची माहिती नसते असे म्हणता येणार नाही. त्यांचा माहितीचा 'सोर्स' हा वर्तमानपत्रांपेक्षा ऑनलाईन आहे हेही खरे आहे. परंतु मोबाईल, टीव्ही चॅनेल्स, यु ट्यूब यापेक्षा आपल्या सर्वांचा बातम्यांचा / माहितीचा जो मूळ सोर्स होता तो रेडिओ या मुलांपासून लांब गेला आहे. अर्थात याचा दोष त्यांना देता येणार नाही. घरचे ज्येष्ठ रेडिओ न ऐकता मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसणार असतील तर मुलांना सवय तरी कशी लागणार ? आधीपेक्षा कमी, पण आजही अनेक घरांमध्ये रेडिओ ऐकला जातो आणि त्यावर अनेक दर्जेदार कार्यक्रम इथे सादर होत असतात. तुम्ही कितीही ऑनलाईन असाल तरी घरी रेडिओ हवाच यात वाद नाही. काल 'द हिंदू' या नावाजलेल्या दैनिकात रेडिओसंदर्भात एक बातमी वाचली आणि रेडिओच्या आठवणी जाग्...

अमेरिकेत बोलबाला Influencers चा !

  अमेरिकेत सध्या अध्यक्षीय निवडणुकीची धामधूम सुरू आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून आपण परत एकदा निवडणूक लढवावी अशी विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांची कितीही इच्छा असली तरी ते शक्य झाले नाही. त्याची कारणे सर्वश्रुत आहेत. त्यांच्या जागेवर उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची निवड उमेदवार म्हणून झाली आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प  यांनी या निवडणुकीत आधी आघाडी घेतली होती, पण आता सध्या तरी अल्पमताने का असेना कमला हॅरिस आघाडीवर आहेत. अजूनही नोव्हेंबरमध्ये नक्की कोण निवडून येतील हे सांगणे कठीण आहे. कमला हॅरिस यांच्या उमेदवारीवर शिकागो येथे गेले चार दिवस सुरू असलेल्या अधिवेशनात शिक्कामोर्तब झाले. हॅरिस यांच्या समर्थनार्थ स्वतः जो बायडेन, बराक व मिशेल ओबामा, हिलरी क्लिंटन यांच्यासह अनेक दिग्गज नेते या अधिवेशनात येऊन गेले. अमेरिकेत राहणारे पण मतदानाचा अधिकार नसलेले लोकही ही भाषणे ऐकत आहेत. कारण ही निवडणूक कदाचित त्यांचेही भविष्य ठरवणार आहे.    हॅरिस आणि त्यांची टीम डेमोक्रॅटिक पक्षाचे जुने मतदार...

एका सच्च्या कार्यकर्त्याची शंभरी

Image
बबन डिसोजा, रतन डिसोजा, मधू दंडवते, प्रमिला दंडवते   वयाच्या १८व्या वर्षी 'भारत छोडो' आंदोलनात सक्रिय सहभाग, राष्ट्र सेवा दलात भरीव काम, मिल मजदूर सभेच्या स्थापनेपासून नंतर अनेक वर्षे सक्रिय सहभाग, प्रजा समाजवादी पक्षाचे पूर्ण वेळ चिटणीस, गोवा विमोचन समितीचे व संयुक्त महाराष्ट्र समितीच्या मुंबई शाखेचे कार्यालयीन सचिव, बॅ. नाथ पै,  मधू दंडवते यांच्या निवडणुकांमध्ये मोठे काम, साने गुरुजींच्या  नेतृत्वाखाली  काम , १९७५मध्ये आणीबाणीच्या विरोधात काम, नंतर मुंबई जनता दलात अनेक वर्षे काम, १९८० साली मालवणमध्ये बॅ. नाथ पै सेवांगणाच्या उभारणीत सिंहाचा वाटा, आणि हे सारे काम करताना अत्यंत निर्मल आणि नि:स्वार्थी स्वभाव, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी ... हे सारे करणाऱ्या श्री. बबन डिसोजा यांचा आज शंभरावा वाढदिवस आहे. माझे वडील, राजकीय कार्यकर्ते, कामगार नेते, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध भूमिकांमध्ये त्यांना मी पाहात आलेले आहे. आणि या सगळ्याबद्दल मला विलक्षण अभिमान आहे. बबन डिसोजा आणि राणी पाटील बबन डिसोजा यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२४ रोजी गणेश चतुर्थीला, माल...

एका लायब्ररीचा मृत्यू ...

Image
  तो साधारण १९८७-८८ चा काळ असावा. आमच्या सोसायटीत दर १५ दिवसांनी एक गृहस्थ ग्रंथपेटी घेऊन यायचे. पंधरा दिवसांपूर्वी दिलेले पुस्तक बदलून वाचकांनी नवीन पुस्तक घ्यावे, ते वाचावे यासाठी. त्यासाठी ते वाचकांकडून अल्प अशी मासिक फी घेत असत. त्यांचे नाव श्री मधू भट होते. ही ग्रंथपेटी केवळ 'व्यवसाय' म्हणून ते चालवत नव्हते. ते स्वतः उत्तम पुस्तके वाचत असत आणि ग्रंथपेटीत उत्तमोत्तम पुस्तकेच असावीत याकडे त्यांचा कटाक्ष असे. वाचकांनाही त्यांची आवडनिवड ओळखून विविध पुस्तके सुचवत असत. त्या सुमारास मी इंदिरा गांधी यांच्यावरील एक लेख अनुवादित केला होता. रविवार पुरवणीत पूर्ण आठ कॉलम म्हणजे पूर्ण पानभर (हो, त्या वेळेस मटामध्ये पूर्ण पानभर लेख प्रकाशित होत होते) आणि उरलेला पान  दोनवर असा तो प्रसिद्ध झाला होता. तीनच दिवसांनी श्री भट यांनी तो अनुवाद आवडल्याचे पत्र घरच्या पत्त्यावर पाठवले होते. मी ते अजून जपून ठेवले आहे. कालांतराने त्यांनी ही फिरती लायब्ररी बंद केली, पण त्यांचे साहित्यप्रेम काही कमी झाले नव्हते. लायब्ररी बंद झाल्याची चुटपुट मात्र अनेकांना लागली होती.  आता साल आठवत नाही, पण नंतर क...

प्रकल्पांची खर्चवाढ टाळता येईल का ?

Image
मुंबईतील वांद्रे वर्सोवा सी लिंक प्रकल्पाचा खर्च ६७८८ कोटी रुपयांनी वाढला आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी ५०८ दिवसांची मुदतवाढ मिळाली ही सौरभ कुलश्रेष्ठ यांनी 'हिंदुस्थान टाइम्स'मध्ये दिलेली बातमी वाचून खेद वाटला असला तरी अजिबात आश्चर्य वाटले नाही. हा खर्च आता ११,३३२ कोटींवरून १८,१२० कोटींवर गेला आहे. वांद्रे वर्सोवा सी लिंक रस्ता हा मरीन लाईन्स ते कांदिवली अशा रस्त्याचा एक भाग आहे. मुंबईतील वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयत्नातील एक भाग म्हणून याकडे पाहता येईल.  वांद्रे वरळी सी लिंक २००९मध्ये पूर्ण झाल्यावर तेव्हाच्या काँग्रेस - राष्ट्रवादी सरकारने वरळी ते नरिमन पॉईंट आणि वांद्रे वर्सोवा असे दोन मार्ग उभारण्याचे ठरवले, परंतु दोन्ही पक्षातील मतभेदांमुळे पुढे काहीच झाले नाही. २०११ मध्ये वांद्रे वर्सोवा मार्ग मंजूर करण्यात आला. पण प्रत्यक्षात काम सुरु झाले नव्हते. २०१७मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा प्रकल्प मार्गी लावण्याचे ठरवले आणि एमएसआरडीसीला ७५०८ कोटींचा हा प्रकल्प पूर्ण करण्यास सांगितले. वर्षभरातच खर्चाचा आकडा वाढून ११,३३२ कोटींवर गेला. तोच आता सात वर्षांनी वाढून १...

... ...आणि अमेरिका जागी झाली !

Image
अमेरिकेत सध्या काही भागात तापमान कमालीचे वाढत आहे. अनेक ठिकाणी वणवे पेटले आहेत. त्यावर कसे नियंत्रण ठेवायचे हे कळत नाहीये. अनेकांची घरे त्यात उध्वस्त झाली, वनजमीन तर पार जाळून खाक झाली.  कॅलिफोर्निया पार्क भागात  सध्या साडेतीन लाख एकरमध्ये हा वणवा पसरलेला आहे. अतिउष्णतेमुळे अमेरिकेत असे वणवे पेटणे ही आता बातमी राहिलेली नाही. बदलत्या हवामानामुळे होणारे हे दुष्परिणाम याच नव्हे तर अन्य देशांनाही कुठे घेऊन जाणार आहेत हा अत्यंत काळजीचा विषय आहे. या वणव्यांबरोबरच अमेरिकेत सध्या चर्चा आहे ती या वणव्यासारख्या पसरलेल्या बातमीची. सध्याचे जग 'सतत ऑनलाईन' असण्याचे जग आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात जरा कुठे खुट्ट झाले की सगळ्यांना कळायला वेळ लागत नाही. आणि मी जी बातमी म्हणतो आहे ती तर जो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याची. अमेरिका शनिवार - रविवार काम करत नाही. सगळे सुटीच्या मूडमध्ये असतात. त्यातही रविवारी दुपारी बातम्या बघितल्या जातीलच असे नाही. बायडेन यांनी माघारीची घोषणा करण्यासाठी हीच वेळ निवडली आणि सगळे जण 'जागे' झाले. पुढच्या तीनपाच मिनिटात ही बातमी अमेरिक...

कमला हॅरिस याना निधी मिळाला, मतांचे काय?

Image
  अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आणखी  चार महिन्यांनी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन आता २४ तास उलटून गेले आहेत. माघार घेतानाच त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नवीन उमेदवार म्हणून सध्याच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला. अर्थात म्हणून त्या आपोआप उमेदवार झाल्या नाहीत. ऑगस्ट महिन्यात डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिवेशन आहे. त्यावेळी पक्षाच्या उमेदवाराची निवड अधिकृतपणे जाहीर होईल. परंतु, गेल्या २४ तासात कमला हॅरिस यांनी निधी संकलनाचा विक्रम नोंदवला आहे. २४ तासांत लहानमोठ्या देणगीदारांनी त्यांना आठ कोटी डॉलर्सपेक्षा अधिक रकमेच्या देणग्या दिल्या आहेत. यात आतापर्यंत या पक्षाला अजिबात देणगी न देणाऱ्यांचाही समावेश आहे हे लक्षात घ्यायला हवे.  कमला हॅरिस याना आतापर्यंत ११०० डेमोक्रॅटिक प्रतिनिधींनी पाठिंबा दिला आहे. म्हणजे अर्धी लढाई त्यांनी जिंकली आहे. पुढचा टप्पा उमेदवारी मिळविण्यापुरता तरी सोपा वाटतो आहे.  हॅरिस यांनी २०२० मध्येच पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. ते अयशस्वी झाले. पण या निमित्ताने त्या देशभर फिरल्या. अमेरिकन लोकांना त्यांची ...

स्वतःचे वेगळे विश्व निर्माण करणारा कलाकार !

Image
आ षाढी एकादशी आली की ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वाचक त्या दिवशीच्या अंकाची वाट बघतात. बातम्यांसाठी नव्हे तर गेली काही वर्षे दोन पाने भरतील इतक्या आकाराचे (आमच्या भाषेत ‘पॅनो ‘) विठ्ठल राखुमाईचे अप्रतिम चित्र पाहायला. कोणतेही वर्तमानपत्र घरात आल्यावर अर्ध्या दिवसांत ‘शिळे’ होते हे खरे असले तरी विठ्ठल राखुमाईचे अप्रतिम चित्र जपून ठेवणारे असंख्य वाचक आहेत हे लक्षात घ्यायला हवे. हे चित्र काढणारा कलाकार आज अवघ्या महाराष्ट्रात / देशात प्रसिद्ध आहे. त्याचे नाव रोहन पोरे. विठ्ठल रखुमाईचे ‘पॅनोरमा’  चित्र अनेकजण घरी फ्रेम करून लावतात. काहीजण तर रेल्वे डब्यात हे चित्र लावून विठ्ठल रखुमाईची पूजा करतात. अलीकडेच ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मायमराठी उत्सव मराठीचा’ या नावाने महोत्सव आयोजित केला होता. त्यात रोहनचा विशेष सहभाग होता. मटामध्ये प्रकाशित झालेल्या निवडक ४० व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन मुंबईत टाइम्स इमारतीत भारावले होते. त्यावेळी मान्यवरांकडून रोहनचे कौतुक झाले होते. त्याचप्रमाणे वाचकांनीही भरभरून प्रतिसाद दिला होता. रोहनने काढलेले  २०२४चे चित्र मुद्दाम इथे देत आहे. रोजच्या अंकात, रविवार पुरवणीत ...

मनोरंजन नव्हे, प्रबोधन !

Image
मुं बईतील लोकल रेल्वे सेवा ही बहुसंख्य लोकांसाठी अत्यावश्यक सेवा आहे. मुंबईत राहणाऱ्या आणि पुढे अगदी कर्जत, कसारा, पश्चिम रेल्वेवर पालघरपर्यंत राहणारे लोक पोट भरण्यासाठी मुंबईत येताना प्रामुख्याने या लोकलचा वापर करतात. मेट्रोचे जाळे वाढत असले तरी ते अजून सर्वसमावेशक झालेले नाही. अन्य सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणाव्या अशा प्रभावी नाहीत. अशा वेळेस लोकलशिवाय पर्यायच नसतो. दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, त्यांना अपुऱ्या पडणाऱ्या गाड्या, अतिताणामुळे यंत्रणेचे वारंवार कोलमडणे यासारख्या अडचणींवर मात करून सर्व प्रवासी प्रवास करत असतात. प्रवासाचा कालावधी कमी असेल तर भाग वेगळा, परंतु जास्त असेल तर अडचणीही जास्त. गाडीत शिरायला मिळाले तर भाग्य असे म्हणायची पाळी काही वेळेस येते. अशा गर्दीत डब्यात शिरून भजनांमध्ये दंग व्हायचे आणि नकळत इतरांनाही सहभागी करून घ्यायचे हे तसे दिव्य काम. बरे, सगळ्यांनाच ती भजने ‘आवडतील’ अशातला भाग नाही. अनेक जण घरगुती कारणांमुळे, कार्यालयीन कामाच्या तणावामुळे, आर्थिक परिस्थितीमुळे त्रासलेले असतात. अशा वेळेस त्यांना डब्यातून प्रवास करताना शांतता हवी असते. त्यामुळे ती मंडळी या भजना...