गोष्टी पाऊसपाण्याच्या (उत्तरार्ध)
म हाराष्ट्रात पाऊस आणि पाणी, बदलते हवामान, प्रदूषण, निसर्गावर मात करण्याचा माणसाचा हव्यास या सगळ्या कारणांमुळे या संदर्भातील असमतोल वाढत आहे. याचे परिणाम नजीकच्या भविष्यकाळातही जाणवतील. हर्षद तुळपुळे आणि स्पृहा आठल्ये यांनी काढलेल्या ‘गोष्टी पाण्याच्या’ या दिवाळी अंकाला म्हणूनच जास्त महत्व आहे. (पूर्वार्ध https://ashokpanvalkar.com/water-spring-rivers-rain-management-and-drought-in-maharashtra/ इथे वाचायला मिळेल) अंक कोकणावर फोकस करणारा असला तरी तीच तत्वे, निकष सगळ्या राज्याला लागू होतात. त्यामुळे केवळ कोकणचा अंक असे संकुचित दृष्टीने याकडे पाहून चालणार नाही. उदा. ‘गोष्टी नद्यांच्या’ या विभागात डॉ. अजित गोखले यांनी लेख लिहिला आहे. आज केवळ कोकणच नव्हे तर महाराष्ट्रात सर्वत्र आणि भारतात अनेक ठिकाणी नद्यांमध्ये साठलेला गाळ ही गंभीर समस्या होऊन राहिली आहे. यावर उपाययोजना म्हणून गाळ उपसा करण्याची जोरदार मोहीम अनेक ठिकाणी हाती घेतली आहे. गाळ उपसा करून नद्या प्रवाही बनवणे ही आजची मोठी गरज असली तरी त्यात कायकाय काळज्या घेतल्या पाहिजेत त्याचा उहापोह करण्याचा प्रयत्न अशा यादृष्टीने या लेखाकडे पाह...