Posts

RNEP ही NEP इतकीच महत्वाची !

Image
Responsible Netism 1st National Cyber Psychology Conference 2017 Theme:  Living Life 2.0: Coming together to Interface our Online and Offline Lives. Date:  January 20-21, 2017 | Mumbai 2nd Conference 2018 – Theme:  Building Cyber Hygiene Culture. Date: January 18-19, 2018 | Mumbai 3rd  Conference 2019 – Theme: Child Online Protection Date: January 8, 2019 – Run-up event at Kolhapur, January 18, 2019 – Run-up event at Aurangabad, January 23, 2019 – Main event at Mumbai 4th Conference 2020 – Theme:  Child Online Protection.   Date:  January 23-24, 2020 | Pune 5th Conference 2021 – Theme:  Coping With Technology, New Education Policy And New Normal Date:  January 23, 2021 | 6th Conference 2022 – Theme:  India Fights Cyber Violence against Women and Children Date:  January 22, 2022 | 6th Conference 2023 – Theme:  Cyber Wellness: Ensuring Mental Well-being in Cyberspace Date:  Saturday, January 21, 2023 | 8th Conference 2024 –...

युपीआय क्रांती कुठपर्यंत?

गे ल्याच महिन्यातील गोष्ट. एका कामानिमित्त एका सहकारी बँकेत गेलो होतो. बँकेची ही शाखा तळमजल्यावरचीच होती आणि ज्येष्ठ नागरिकांनाही बँकेत व्यवहार करताना काही अडचण येणार नाही, याची काळजी घेणारी होती. एक साधारण ७५-८० वर्षे वयोगटातील आजी शाखेत आल्या आणि कशा कोणास ठाऊक पायरीला अडकून एकदम पडल्या. उपस्थित सगळा कर्मचारी वर्ग त्यांच्या मदतीला धावला. त्यांना खुर्चीवर बसवले. सुदैवाने कुठेच काहीच गंभीर दुखापत नव्हती. आजींसह सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. मदतीसाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या त्या बँकेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना विचारले, ‘अहो आजी, स्वतः कशाला आलात, आम्हाला फोन करायचा, कोणाला तरी घरी पाठवले असते’. आजींचे उत्तर असे होते, ”अगं हो, पण मलाच राहवेना म्हणून आले. मला माझ्या फोनमध्ये गूगल पे की काय म्हणतात ते टाकून हवे आहे, ते कसे वापरायचे तेही सांग. माझी मुले / नाती सांगतात की आता जास्त रोख पैसे जवळ ठेवू नकोस. त्यापेक्षा मोबाईलवरून पैसे देत जा. मला हे तातडीने हवे होते, म्हणून स्वतः बँकेत आले.’ बँकेतील लोकांना लगेच काय प्रतिक्रिया द्यावी ते कळले नाही, पण त्यांनी आजी...

निर्वासितांच्या प्रश्नाचे भयाण वास्तव

  बातमी -१ आर्मेनियातील दोन तृतीयांश निर्वासित मुले आता शाळेत शिकत आहेत. उरलेल्या एक तृतीयांश मुलांचाही सहभाग त्यात असेल या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. तशी सूचनाच ‘युनिसेएफ’ने केली आहे. आर्मेनियात निर्वासित म्हणून आलेल्या या मुलांना सलग शिक्षण मिळालेले नाही. अनेक वेळ त्यात खंड पडला आहे. त्यांना नीट शिक्षण मिळावे आणि निदान ते शिक्षणाच्या बाहेर फेकले जाऊ नयेत यासाठी सध्याची यंत्रणा काम करत आहे. ‘शाळा ही केवळ शिक्षणाची ठिकाणे नाहीत. निर्वासित मुलांसाठी ती सर्वात महत्वाची जागा आहे. त्यांच्या कठीण परिस्थितीतून बाहेर येऊन नव्याने आयुष्य उभारण्यासाठीचे महत्वाचे ठिकाण आहे. या शाळा त्यांना शिक्षण देतात, अन्न देतात, त्यांच्या मानसिक स्थितीवर मार्गदर्शन करतात, अन्य समाजाशी मिळूनमिसळून राहतील हे पाहतात आणि याशिवाय लागेल ती मदत करतात, असे ” युनिसेफ आर्मेनियाच्या प्रतिनिधी क्रिस्टीन वीगँड आवर्जून सांगतात. . बातमी -२ जर्मनीत निर्वासितांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ज्यांचा निर्वासित म्हणून येण्यासाठीचा अर्ज फेटाळला गेला आहे, त्यांना परत त्यांच्या मूळ देशात प...

समाधी संजीवन ...

Image
(डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या समाधीचा शोध कसा घेतला आणि ती समाधी प्रत्यक्ष पाहिल्यावर काय भावना मनात आल्या हे नेमके मांडणारा विद्या हर्डीकर सप्रे यांचा हा लेख. ) ब राच वेळ नकाशातून वाट काढत काढत  मी आणि अशोक (माझा नवरा)  एका दफन भूमीच्या दारात पोहोचलो. मला पहाताच समोरची बाई चटपटीतपणे पुढे आली आणि हसतमुखाने विचारती झाली, “ Are  you  here   for  Dr  Joshi ?”   मी चकितच झाले. “ How do you know ?” मी विचारले.. तिन सांगितलं की ,” तू भारतीय  दिसते आहेस. इथे खूप भारतीय येतात डॉ. जोशींच्या समाधीला भेट द्यायला.! खरं तर   या दफन भूमीत सर्वात  जास्त  भेट दिली जाणारी .. सर्वात लोकप्रिय समाधी आहे ही ! “ आणि आमच्या वॉकिंग टूर मध्ये आम्ही या समाधीचाही सामावेश केलाआहे.” हे ऐकून मला अभिमानानं भरून आलं ! त्या स्वागतिकेन मला दफनभूमीचा नकाशा दिला. ‘कार्पेन्टर/ Eighmie  लॉट’ कुठे आहे त्याची खूण  नकाशावर केली आणि तिथे जायचा मार्गही दाखवला.  आमचे  मिशन ‘ए २१६’ सुरु कझाले ! ( Eighmie हे कार्पेन्टर मावशीच्या माहेरचे नाव. ) मी  त्यांच्या नोंदणीपत्रकात मोठ्या अभिमानाने आमची नाव नोंदवली आणि आम्ही मार्गस्थ झालो. कार...

गोष्टी पाऊसपाण्याच्या (उत्तरार्ध)

म हाराष्ट्रात पाऊस आणि पाणी, बदलते हवामान, प्रदूषण, निसर्गावर मात करण्याचा माणसाचा हव्यास या सगळ्या कारणांमुळे या संदर्भातील असमतोल वाढत आहे. याचे परिणाम नजीकच्या भविष्यकाळातही जाणवतील. हर्षद तुळपुळे आणि स्पृहा आठल्ये यांनी काढलेल्या ‘गोष्टी पाण्याच्या’ या दिवाळी अंकाला म्हणूनच जास्त महत्व आहे. (पूर्वार्ध https://ashokpanvalkar.com/water-spring-rivers-rain-management-and-drought-in-maharashtra/ इथे वाचायला मिळेल) अंक कोकणावर फोकस करणारा असला तरी तीच तत्वे, निकष सगळ्या राज्याला लागू होतात. त्यामुळे केवळ कोकणचा अंक असे संकुचित दृष्टीने याकडे पाहून चालणार नाही. उदा. ‘गोष्टी नद्यांच्या’ या विभागात डॉ. अजित गोखले यांनी लेख लिहिला आहे. आज केवळ कोकणच नव्हे तर महाराष्ट्रात सर्वत्र आणि भारतात अनेक ठिकाणी नद्यांमध्ये साठलेला गाळ ही गंभीर समस्या होऊन राहिली आहे. यावर उपाययोजना म्हणून गाळ उपसा करण्याची जोरदार मोहीम अनेक ठिकाणी हाती घेतली आहे. गाळ उपसा करून नद्या प्रवाही बनवणे ही आजची मोठी गरज असली तरी त्यात कायकाय काळज्या घेतल्या पाहिजेत त्याचा उहापोह करण्याचा प्रयत्न अशा यादृष्टीने या लेखाकडे पाह...

गोष्टी पाऊसपाण्याच्या (पूर्वार्ध)

यंदा पावसाने ओढ दिल्याने नोव्हेंबर महिन्यातच दुष्काळाची दाहकता जाणवू लागली असून, पुढील उन्हाळा गंभीर असेल, याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत. गेल्या आठवडय़ात ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता १७८ तालुक्यांमधील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मदत व पुनर्वसनविषयक उपसमितीने गुरुवारी (नऊ नोव्हेंबर २०२३) घेतला. त्यामुळे राज्यातील एकूण २१८ तालुक्यांमध्ये म्हणजेच जवळपास निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात यंदा अपुरा पाऊस झाल्यामुळे अनेक विभागांत दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. या भागांत दुष्काळ जाहीर करून उपाययोजना करून मदत देण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्याची दखल घेत राज्य सरकारने गेल्याच आठवडय़ात १६ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर केली होती. नंतर  सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण २१८ तालुक्यांमधील १२०० पेक्षा अधिक महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. (बातमी – लोकसत्ता १० नोव्हेंबर २०२३)   राज्यातली ही ताजी स्...

कौतुकास्पद यश

भा रतीय खेळाडूंच्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होते आणि हे यश क्रिकेटशिवाय इतर खेळांमधील आहे ही बाब खूप सुखावून जाणारी आहे. नुकत्याच संपलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ ब्राँझ पदकांसह विक्रमी १०७ पदकांची कमाई केली. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या यशात क्रिकेट संघाचाही वाटा असला तरी तो एकूण स्पर्धेच्या तुलनेत इवलासा होता हे महत्वाचे आहे. नेमबाजी, घोडेस्वारी, टेनिस, स्क्वाश, अॅथलेटिक्स, तिरंदाजी, हॉकी, कबड्डी, बॅडमिंटन, रोविंग, सेलिंग , वुशू, गोल्फ, बॉक्सिंग, ब्रीज, टेबल टेनिस, कुस्ती, रोलर स्केटिंग, सपक टेकरा … यापैकी प्रत्येक खेळात भारताने पदक मिळवले. २००२ नंतर भारताची कामगिरी चढत्या क्रमाने होत आहे. अपवाद २०१४चा. २००२मध्ये ३६ पदके होती, २००६ मध्ये ५३, २०१० मध्ये ६५, २०१४ मध्ये ५७, २०१८मध्ये ७० आणि आता शंभरीपार १०७ ! फक्त क्रिकेटपटूंचे कौतुक करण्याची सवय असणाऱ्या भारताला हा अलीकडच्या काळातला सर्वात मोठा सुखद धक्का म्हणायला हवा. प्रत्येक खेळाडूचे अभिनंदन. ! भारताने अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केली. सुवर्णपदकांच...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी कायमस्वरूपी काम

काल एक ऑक्टोबर रोजी अनेक राजकीय नेते हातात लहान मोठा झाडू घेऊन रस्ता अथवा त्या लगतचा भाग साफ करताना आपण पाहिले. हे कृत्य स्वच्छतेचा संदेश देणारी प्रतीकात्मक कृती होती हे मान्य करायला हवे. त्यांनी रोज हे काम करणे अपेक्षितही नाही. परंतु, स्वच्छता ही एका दिवसाची गोष्ट नाही. एक दिवस साजरा झाला की दुसऱ्या दिवसापासून परत सगळे सुरळीत होते हे आपण अनेकदा पाहिले. राजकीय / सामाजिक क्षेत्रातील मोठ्या लोकांच्या जयंती / पुण्यतिथी या दिवशी  त्यांची आठवण जागवली जाते, पण त्यांची शिकवण बाकीचे ३६४ दिवस किती लोक लक्षात ठेवतात हा प्रश्नच आहे. स्वच्छता असो, जयंती / पुण्यतिथी असो वा अन्य सामाजिक उपक्रम असोत, त्यात सातत्य नसले की मूळ अपेक्षित काम होऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर एक ऑक्टोबरलाच हिंदुस्थान टाइम्स या इंग्रजी दैनिकात नीरज पंडित यांनी दिलेली बातमी लक्षवेधी वाटली. ती होती वृक्ष लागवडीची. वृक्षारोपणाचेही ‘इव्हेंट’ आपल्याकडे होतात. रोप लावतानाचे फोटो छापून येतात. नंतर त्या रोपांचे काय होते, किती जागवली जातात आणि किती अदृश्य होतात ते कळतही नाही. परंतु मी ज्या बातमीबद्दल बोलतो ती बातमी वेगळी आहे. ...

ग्रंथ संयुक्त अरब अमिरातीच्या दारी....

Image
सा धारण पंधरा वर्षांपूर्वी आजच्याइतका समाजमाध्यमांचा प्रभाव नव्हता. वाचनसंस्कृती चांगल्यापैकी अस्तित्वात होती. आज अस्तंगत झाली असे मला सुचवायचे नाही, पण विविध वाचनालयांमधली वाचकांची घटती संख्या आणि घटलेली पुस्तकविक्री पाहता असे अनुमान काढता येते. समाजमाध्यमे, कोविड, ऑनलाईन वाचन यामुळे पुस्तक हातात धरून वाचणारे वाचक कमी झाले. हे वाचन वाढावे म्हणून पुस्तके वाचकांना घरी देण्याचेही उपक्रम सुरु झाले. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे विश्वस्त श्री. विनायक रानडे यांनी एकच ध्यास घेतला आणि तो म्हणजे वाचकांना त्यांच्या घराजवळ उत्तम वाचनीय पुस्तके उपलब्ध करून देण्याचा! त्यातूनच २००९ ला अशा वाचन प्रेमींसाठी ‘ग्रंथ तुमच्या दारी ‘ या योजनेचा उगम झाला. भारतात ह्या योजनेत १०० पुस्तकांची एक पेटी असते, जी साधारण ३५ वाचकांच्या समूहासाठी असते. भारताबाहेर या योजनेत सोयीनुसार बदल झाले. मूळ ध्येय पुस्तकवाचन अधिकाधिक व्हावे, अधिकाधिक वाचक या योजनेशी जोडले जावेत हे असल्याने ‘ग्रंथ तुमच्या दारी ‘ योजना अनेक घरांपर्यंत पोचली. मराठी भाषक जगभरात जवळपास प्रत्येक देशात आहेत...

विश्वाची नवलकथा !

चं द्रयान -३ चंद्रावर उतरल्यावर आपण काही दिवसांतच सूर्याचा आभास करण्यासाठी आदित्य एल वन या नावाने मोहीम हाती घेतली. या दोन्ही घटनांबद्दल भारतात प्रचंड प्रमाणात जल्लोष झाला, आनंद व्यक्त झाला. इस्रोच्या कामगिरीबद्दल कमालीचा अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटला. जगभरात इस्रोचे कौतुक झाले, ही जगाची मोहर तेवढीच महत्वाची होती. केवळ या विषयापुरते नव्हे तर एकूणच विश्व कसे आहे, परग्रह कसे आहेत, आकाशगंगा म्हणजे काय, हे विश्व कसे निर्माण झाले, त्यात कसकसे बदल झाले, अजूनही आपल्याला हे विश्व नीटसे कळले नाही – ते कधी कळणार, या साऱ्या पसाऱ्यात पृथ्वी एका सूक्ष्म कणाएवढी आहे, मग या पृथ्वीचे पुढे काय होणार, म्हणजेच पर्यायाने मानवजातीचे (आणि अन्य ग्रहांवर जीव असलेच तर त्यांचे काय होईल) यांसारखे असंख्य प्रश्न आपल्याला पडलेले असतात. त्याची संपूर्ण उत्तरे अजून कोणालाही मिळालेली नाहीत. त्यामुळे आपली उत्सुकता अधिक वाढायला मदत झाली आहे. मानव विज्ञानात प्रगती करत आहे, आता सारे कळेल असे वाटत असतानाच नवे विश्व समोर येते आणि मग हा सारा पसारा आहे तरी किती असे विचार पुन्हा आपल्या मनात येतात. …. विश्वाच्या निर्मितीवर, त्...